केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीतील २० वा हप्ता २० जून रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीतील २० वा हप्ता २० जून रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
‘रत्नागिरीच्या हापूस आंब्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. त्याचप्रमाणे कोकणात काजू उत्पादनातूनही ब्राझीलप्रमाणे क्रांती होऊ शकते. नोकरीच्या तुलनेत शेतीतून दसपट अधिक पैसे मिळू शकतात; मात्र त्यासाठी आत्मपरीक्षण करून शेती वाढवली पाहिजे. शेतीत विविधता आणली पाहिजे. भात, नाचणीबरोबरच फळबागा लागवड क्षेत्र वाढवलं पाहिजे. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून घेऊन शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत,’ असं आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.
रत्नागिरीत आज (१० मे) अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह आणि कृषी विकास परिषदेचं उद्घाटन झालं.