रत्नागिरीतील शेतकऱ्यांना भात, नाचणीच्या सुधारित जातींचे बियाणे मिळणार मोफत; मुदत दोन दिवस

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात (२०२५) भात आणि नाचणीच्या सुधारित जातींचे बियाणे मोफत देण्यात येणार आहे. फक्त त्यासाठी शेतकऱ्यांना ३० मेपर्यंत आपल्या गावातील कृषी सहायक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. जिल्हा नियोजन निधीमधून यासाठीचा खर्च केला जाणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ‘विकेल ते पिकेल’ कार्यक्रमात शहापूरच्या महिलेचा संवाद

ठाणे : गटशेती करीत असल्यामुळे सिंचनाची व्यवस्था झाली. त्यामुळे गेल्या वर्षी भेंडी, मिरची गवार भाजीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले. याशिवाय ट्रक्टर आणि शेततळ्याचा लाभ झाल्याचे शहापूर तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी जानकी तुकाराम बगळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘विकेल ते पिकेल’ या कृषी विभागाच्या ऑनलाइन कार्यक्रमात संवाद साधून स्पष्ट केले.

‘विकेल ते पिकेल’ या धोरणावर मुख्यमंत्र्यांचा आज १२.३० वाजता शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कृषिविषयक योजनांच्या संदर्भात गुरुवार, १० सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत शेतकऱ्यांशी ऑानलाइन संवाद साधणार आहेत.