रत्नागिरीतील १३०३ गावांमध्ये तीन वर्षे मलेरियाचा रुग्ण नाही

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील १३०३ गावांमध्ये गेल्या सलग तीन वर्षांमध्ये हिवताप अर्थात मलेरियाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे ही कीटकजन्य आजारमुक्त गावे म्हणून घोषित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाच्या अनन्या मुरकरची इस्रो दौऱ्यासाठी निवड

रत्नागिरी : लक्ष्मी चौक येथील (कै.) केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयाची विद्यार्थिनी अनन्या रत्नदीप मुरकर हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.

व्यक्तिमत्त्व विकास शिबिराला मूकबधिर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

रत्नागिरी : येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या (कै.) के. प. अभ्यंकर मूक-बधिर विद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी झालेल्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.