रत्नागिरी : करोनाच्या संकटाने महाराष्ट्रात रौद्र रूप धारण केलेले असतानाच, मुंबई आणि कोकण किनारपट्टीकडे येत्या दोन दिवसांत चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. त्यामुळे या भागांत अति वेगाने वारे वाहतील, तसेच, काही ठिकाणी अति-मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने आज (३१ मे) रात्री सव्वाआठ वाजता जाहीर केलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून, ‘एनडीआरएफ’चे जवानही तैनात केले जात आहेत.