ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर नगर (ठाणे) बाळासाहेबांची शिवसेना आयोजित कोकण महोत्सवाला ठाण्यात आज (दि. २९ ऑक्टोबर) प्रारंभ झाला. हा महोत्सव येत्या ६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे आरवली (ता. वेंगुर्ले) येथील आरवली गावचे ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.