सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद जगवला पाहिजे : डॉ. अशोकराव मोडक

रत्नागिरी : कम्युनिस्ट, डाव्यांच्या रशियाला अजूनही युक्रेनवर निर्णायक विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही देशांचे मूळ एकच आहे. परंतु परकीय निष्ठा सांगणाऱ्या कम्युनिस्ट राष्ट्रवादाचा पराभव होत आहे. त्याच वेळी वीर सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद आजच्या काळात महत्त्वाचा आहे. तो आपण साऱ्यांनी जगवला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी केले. भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी लिहिलेल्या ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यावर ते बोलत होते.

Continue reading