राजापूर : शासनाच्या मदतीची अपेक्षा न करता राजापूरजवळच्या धोपेश्वर गावातील खांबलवाडीच्या ग्रामस्थांनी श्रमदान आणि स्वखर्चातून खासगी नळपाणी योजना राबविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी खोदलेल्या विहिरीला पहिल्याच दिवशी पाणी मिळाल्याने ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश आले आहे.