महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, भारताचा वैभवशाली इतिहास : धनंजय चितळे

‘महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, तर भारताचा वैभवशाली इतिहास आहे. नीतिमूल्यांपासून मनुष्यस्वभावापर्यंत, युद्धतंत्रापासून व्यवस्थापन कौशल्यापर्यंत आणि अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत सर्वच गोष्टींचे धडे आपल्याला यातून मिळतात. त्यामुळे हे धडे घेण्यासाठी मूळ महाभारताचे बारकाईने वाचन आणि त्यावर चिंतन आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार धनंजय चितळे यांनी केले.

रत्नागिरीत २०-२१ डिसेंबरला “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” व्याख्यानमाला

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या २० आणि २१ डिसेंबरला “विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत” ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यातील दोन्ही पुष्पे प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे गुंफणार आहेत.