रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासोबतच रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रत्नागिरी जिल्हास्तरीय करोना टास्क फोर्सच्या बैठकीत आज (३० जून) झाला. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई आणि अन्य मोठ्या शहरांप्रमाणेच रत्नागिरीतही करोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा उपचार करणे शक्य होणार आहे.