वस्त्रसंहिता आणि आचारसंहिता

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरिता वस्त्रसंहिता अमलात येणार आहे, ही फारच चांगली बाब आहे. सर्वच मंदिरांमध्ये ती व्हायला हवी आहे. पण वस्त्रसंहिता जारी करतानाच मंदिराच्या व्यवस्थापनाच्या बाजूने असलेली आचारसंहिताही तेवढीच महत्त्वाची आहे. मंदिरांचे पावित्र्य भाविकांनी जपले पाहिजे, हे जितके खरे आहे, तितकेच मंदिराचे व्यवस्थापन आणि प्रामुख्याने पुजारी यांनीही आचारसंहिता पाळली पाहिजे.

फटाक्यांविना दिवाळी

हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी फटाके वाजवू नयेत, अशी हास्यास्पद सूचना देणारे लोकप्रतिनिधी याचा विचार कधी करणार आहेत? फटाके वाजवायला बंदी करण्यापेक्षा मुळातच फटाक्यांची निर्मितीच थांबविली गेली पाहिजे. फटाके तयारच झाले नाहीत, तर ते वाजविले जाणारच नाहीत. दिवाळी म्हणजे दिव्यांचा, प्रकाशाचा सण आहे. आवाजाचा नव्हे, हे लोकमानसावर ठसले पाहिजे. प्रकाशाच्या, प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त दिवाळीसाठी शुभेच्छा!