जलवर्धिनीच्या पर्जन्य जलसाठवण उपक्रमाची सुरेश प्रभूंकडून दखल

रत्नागिरी : मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानने गेल्या काही वर्षांपासून कोकणासह विविध ठिकाणी राबविलेल्या पावसाचे पाणी साठवण्याच्या उपक्रमाची माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेतली आहे. हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातही राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.