रत्नागिरीत आतापर्यंत सरासरीच्या ३८ टक्के पाऊस; ८८ टक्के क्षेत्रावर लावणी पूर्ण; कोट्यवधींचं नुकसान; मात्र निधी अप्राप्त

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याची सुरुवात मे महिन्यातच झाली आणि मे महिन्यात ५२० मिलिमीटर पाऊस पडला. जूनमध्येही चांगला पाऊस झाला; मात्र एक जूनपासून १८ जुलैपर्यंतच्या (२०२५) कालावधीचा विचार करता वार्षिक सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस पडला आहे.

मंडणगडमध्ये २११.२५ मिमी पाऊस; आज मुंबई आणि रायगडातही जोरदार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारच्या अल्पशा विश्रांतीनंतर रविवारचा पूर्ण दिवस पुन्हा एकदा पावसाचा होता. मुंबईत आज (२६ मे) मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असून, अंधार दाटून आला आहे. रायगड जिल्ह्यात (२६ मे) मध्यरात्रीपासून मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला आज पावसाचा रेड अ‍ॅलर्ट

भारतीय हवामान विभागाने २२ मे २०२५ रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार २२ ते २६ मेदरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संगमेश्वरातील वीजपुरवठा उद्या दुपारी सुरू होणार

संगमेश्वरजवळ महामार्ग चौपदरीकरणाचं काम सुरू असताना माती उकरल्यामुळे आज (२१ मे) संध्याकाळी सहाच्या सुमारास वडाचं झाड कोसळलं आणि कसबा उच्चदाब वीजवाहिनीचे सहा खांब वाकले.

मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपलं; जनजीवन विस्कळीत; वीज पडल्यामुळे नुकसान

मान्सूनपूर्व पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला काल (२० मे) अक्षरशः झोडपून काढलं. विजांचा कडकडाट, मेघगर्जना आणि वाऱ्यांसह पडलेल्या या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर अशा जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मोठा पाऊस झाला.