रत्नागिरी : कोकण रेल्वेच्या मार्गावर पुन्हा तुतारी एक्स्प्रेस आणि राजधानी एक्स्प्रेस या दोन गाड्या धावणार आहेत. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या निर्धारित वेळेआधी किमान एक तास स्थानकात उपस्थित राहावे लागणार आहे. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कोकण रेल्वे प्रत्येक प्रवाशाची गाडीत प्रवेश करण्यापूर्वी तपासणी करणार आहे.