संपूर्ण महाराष्ट्रात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी

मुंबई : राज्यात करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात रविवार, २८ मार्च २०२१च्या रात्रीपासून जमावबंदी (Night Curfew) लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू

सिंधुदुर्गनगरी : करोनाप्रतिबंधाचा उपाय म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून रात्री ११ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी बजावले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनाप्रतिबंधासाठी रात्रीची संचारबंदी लागू

रत्नागिरी : करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज पहाटेपासूनच (२२ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून) ती लागू झाली असून संचारबंदी किती तारखेपर्यंत लागू राहणार आहे, याचा उल्लेख आदेशात करण्यात आलेला नाही. साथरोग प्रतिबंधक कायद्याचा अवलंब करण्यात आला आहे. रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.