रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविल्याबद्दल आभार

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत रत्नागिरी रिफायनरीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल कोकण जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे मुखमंत्र्यांना धन्यवाद देण्यात आले आहेत. कोकणाच्या जनतेला बेरोजगारीच्या विळख्यातून बाहेर काढून समृद्धीची पहाट दाखवण्यासाठी रिफायनरी प्रकल्पाची लवकरात लवकर अधिसूचना जारी करावी, असे आवाहन जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर आणि प्रवक्ते अविनाश महाजन यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात केले आहे.

Continue reading