रत्नागिरी : रत्नागिरी पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या कल्पक धोरणाअभावी शहरातील पालिका शाळांची दुर्दशा झाली आहे. ती सुधारण्याच्या दृष्टीने योजना तयार करण्याकरिता दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजपने एक विशेष समिती स्थापन केली असून एका महिन्यात ही समिती आपला अहवाल देईल, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.