मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) आणि राष्ट्रीय विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी) नुकताच होऊन गेला. तसंच, मार्च २०२१मध्ये होऊ घातलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर या थोर वैज्ञानिक साहित्यिकाची निवड झाली आहे. अशा तिहेरी औचित्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘ऐका वैज्ञानिकांच्या कथा’ हा उपक्रम आजपासून सुरू करत आहोत. अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि साप्ताहिक कोकण मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.