पद्मश्रींनी जोपासलेल्या कळसूत्रीच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा जागर

सिंधुदुर्गनगरी/रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांत राज्यात राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लोककलांचा उपयोग करून आजपासून जागर सुरू झाला आहे.