सायबर गुन्ह्यांचं प्रमाण शून्यावर आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात
पुढच्या महिन्यात एकाच दिवशी सर्व ८४९ ग्रामपंचायतींमध्ये महाजनजागृती मोहीम
राबवली जाणार आहे. बँकांनी ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यांचा सायबर विमा
उतरवावा, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.