‘निसर्ग’मुळे कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान; ‘जीआय’ १० वर्षे लांबणार

रत्नागिरी : गेल्या तीन जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुपारी संशोधन केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुपारीची लागवडच उद्ध्वस्त झाल्याने विद्यापीठाने विकसित केलेल्या सुपारीच्या श्रीवर्धनी प्रजातीला भौगोलिक निर्देशन (जीआय) मिळवून देण्याची प्रक्रिया तर तब्बल दहा वर्षे लांबणार आहे. त्यामुळे विद्यापीठाबरोबरच बागायतदारांचेही नुकसान होणार आहे.

Continue reading