बेघर निवारा केंद्रे उभारण्याची वेळ न येण्यासाठी आत्मचिंतनाची गरज; केंद्राच्या उद्घाटनावेळी पालकमंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा

रत्नागिरी नगर परिषदेच्या आधार नागरी बेघर निवारा केंद्राचे उद्घाटन आज (२१ जुलै) पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला आहे.