नाणार रिफायनरी प्रकल्पाची पुन्हा एकदा चर्चा सुरू

रत्नागिरी : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाची भूमिका घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर काहीसा मागे राहिलेला प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमदार श्री. जाधव यांनी रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतल्याने प्रकल्प समर्थकांना बळ मिळाले असून, कोकणच्या विकासासाठी कोकणातील सर्व लोकप्रतिनिधींनी भूमिका घ्यावी, असे आवाहन प्रकल्प समर्थकांकडून केले जात आहे.

Continue reading