रत्नागिरी : करोनाच्या लढ्यात जनतेला घरी थांबायला सांगण्यात आले आहे. त्याकरिता आवश्यक त्या सुविधा पुरवायला प्रशासन सज्ज आहे. प्रशासनाचाच एक भाग असलेली आणि अखंड वीजपुरवठ्याची जबाबदारी असलेली महावितरण कंपनी किती सज्ज आहे, याची चुणूक कंपनीने दाखवून दिली आहे. एका निराधार वृद्धेला एका दिवसात वीजपुरवठा करून महावितरण कंपनीने आपली सज्जता सिद्ध केली आहे.