रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : भारतीय तटरक्षक दल-रत्नागिरी, मत्स्य व्यवसाय विभाग-सिंधुदुर्ग आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना सागरी सुरक्षेच्या दृष्टीने घावयाच्या काळजीबाबतची माहिती ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आली.