पर्यटक कोकणात राहण्यासाठी यावेत यासाठी प्रयत्न : अनिल परब

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येणारे पर्यटक दोन-चार दिवसांसाठी राहिले, तर जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, हे लक्षात घेऊन पर्यटन धोरण आखले जाईल, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने आयोजित केलेल्या वारसा पर्यटन या विषयावरील तिसऱ्या शाश्वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

Continue reading