सिंधुदुर्गनगरी : भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा करताना पहिल्या पाच क्रमांकात जिल्ह्याचे नाव राहील अशा पद्धतीने काम करू या, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.