रत्नागिरी : भारतीय टपाल विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हवामानातील संकटावर का आणि कशा प्रकारे उपाययोजना करता येईल, या संदर्भात एका प्रभावशाली व्यक्तीस पत्र लिहावयाचे आहे. उत्तम पत्रांकरिता ५० हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जाणार आहेत.