मुंबई : राज्यात करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात रविवार, २८ मार्च २०२१च्या रात्रीपासून जमावबंदी (Night Curfew) लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.