करोना मृत्यूमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या संगोपनासाठी तीन संस्था

रत्नागिरी : करोनाच्या संसर्गामुळे आईवडील दोघांचेही निधन झाल्यावर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याने अशा बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृतीदल (Task Force) स्थापन करण्यात आले आहे. या कृतीदलाने तीन संस्थांची नावे निश्चित केली आहेत.