रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : कोविड-१९च्या कारणामुळे ज्या बालकांचे दोन्ही कायदेशीर पालक (आई-वडील) किंवा दत्तक पालकांचं निधन झाले असून, त्यामुळे ती अनाथ झाली आहेत, अशांसाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन (PM Cares for Children) हा उपक्रम केंद्र सरकार राबवत असून, त्याला एक वर्ष झाले आहे. या योजनेअंतर्गत आज सकाळी (३० मे २०२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना वेगवेगळे लाभ उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने झाला. रत्नागिरीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते या योजनेची प्रमाणपत्रे जिल्ह्यातील बालकांना वितरित करण्यात आली.