रत्नागिरी : घरगुती वीजपुरवठा बंद पडला, तर आता कोणाला फोन करायची किंवा ठरावीक ठिकाणी जाऊन तेथे ठेवलेल्या नोंदवहीत तक्रार नोंदविण्याची गरज नाही. वीजग्राहकांना जलद आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाइलद्वारे मिस्ड कॉल आणि एसएमएस अशी सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.