धारदार शस्त्रापेक्षा मन धारदार विचारांनी मजबूत हवे : अभिजित हेगशेट्ये

रत्नागिरी : शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यास उत्साहाने प्रारंभ करण्यात आला. खेडशी (ता. रत्नागिरी) येथे १७ मार्च २०२३ रोजी पथनाट्याद्वारे जागर करण्यात आला.