मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेमार्गावरून आणखी ३८ जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व गाड्या पश्चिम रेल्वेवरून सुटणार असून वसई स्थानकात थांबून पुढे येणार असल्याने पश्चिम रेल्वेमार्गावर राहणाऱ्या चाकरमान्यांना त्या सोयीच्या ठरणार आहेत.