रत्नागिरी : रत्नागिरीच्या अंबर मंगल कार्यालयात बुधवारी (२७ जानेवारी) तिसरी शाश्वत पर्यटन परिषद होणार आहे. पालकमंत्री, खासदार, आमदार आणि तज्ज्ञ यावेळी उपस्थित राहणार आहेत. कोकणातील पर्यटनवाढीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांनी परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.