रत्नागिरी : ‘रत्नागिरी जिल्हा उद्योगाच्या दृष्टीने राज्यात अग्रेसर ठरावा, यासाठी तो इनोव्हेशन डिस्ट्रिक्ट म्हणजेच नवप्रवर्तन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) येत्या तीन ते चार महिन्यांत तयार करण्यात येणार आहे,’ अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री उदय सामंत यांनी आज (२७ ऑगस्ट) ऑनलाइन पत्रकार परिषदेत दिली. तसेच, सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या तीन वर्षांत फाइव्ह स्टार हॉटेलच्या पहिल्या टप्प्यातील १२० खोल्या उभारण्याबाबतचा सामंजस्य करार आज झाल्याचेही त्यांनी सांगितले.
