रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या तौते चक्रीवादळात अनेकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे त्यांना भरपाई मिळण्याची शक्यता नाही. हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन ‘द फिफ्थ पिलर’ नावाची संकल्पना राबविली आहे. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर नुकसान झालेल्या कोणाही बागायतदाराला, मत्स्य व्यावसायिकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही आपल्या नुकसानीविषयीची छायाचित्रे आणि व्हिडीओ सादर करता येऊ शकतील.