पर्यटकांसाठी स्व-संरक्षणाचे सूत्र

नजरेत न मावणाऱ्या अथांग सागराच्या किनाऱ्यावरचा अनुभव स्वतःला विसरायला लावणाराच असतो. त्यातही किनारपट्टीच्या प्रदेशात वास्तव्य नसलेल्यांना तर या अनुभवाचे विशेष अप्रूप असते; मात्र थोड्याशा निष्काळजीपणामुळेही हा अनुभव जीवनाची अखेर करू शकतो, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. किनाऱ्यावर जीवरक्षक तैनात असणे, धोक्याच्या सूचनांचे फलक लावणे, दुर्घटना घडल्यास वैद्यकीय सेवा आणि अँब्युलन्ससह अन्य आपत्कालीन यंत्रणा सज्ज असणे आदी बाबी अपरिहार्यच आहेत; मात्र पर्यटकांनी स्वतः सावध असणे हे त्याहून किती तरी महत्त्वाचे आहे.