वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धांचे प्राबल्य असताना, रत्नागिरी जिल्ह्यातल्या पावसजवळच्या कुर्धे या गावात १३० वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेच्या रूपाने ज्ञानज्योत पेटवली गेली ती सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी. त्या वेळची सामाजिक परिस्थिती पाहता ही घटना म्हणजे क्रांतिकारीच म्हटली पाहिजे. अशा या वैशिष्ट्यपूर्ण शाळेची माहिती देत आहेत त्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आता कुर्ध्यातल्याच राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक असलेले उदय श्रीकृष्ण फडके…