विठ्ठला महाकाळ यांचे आकस्मिक निधन; कला, साहित्य, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ गावचे सुपुत्र विठ्ठला महाकाळ यांचे शनिवारी (४ मार्च २०२३) रत्नागिरीतील राहत्या घरी आकस्मिक निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. शासनाच्या कृषी विभागात असताना त्यांनी इतरही विविध क्षेत्रांत कार्य केले.