काजू उद्योजकांना आयात काजूची भीती नको – डॉ. परशराम पाटील

लांजा : भारतीय काजूगराची चव, स्वाद पाहता भविष्यात भारतीय काजूची मागणी वाढतीच राहणार आहे. भारतीय उद्योजकांनी आयात होणाऱ्या काजूची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे उद्गार भारत सरकारच्या कॉमर्स मंत्रालयाचे स्टार्ट अप इंडिया आणि आशियाई विकास बँकेचे सल्लागार डॉ. परशराम पाटील यांनी काढले.