रानभाज्यांवर प्रक्रियेच्या दृष्टीने हवं संशोधन; व्यावसायिक उपयोगासाठी करावेत वेगळे प्रयोग : उदय सामंत

‘रानभाज्यांचे गुणधर्म लक्षात घेता, त्या केवळ महोत्सवापुरत्या मर्यादित राहू नयेत. त्यांचा वापर वर्षभर करता येण्याच्या दृष्टीने प्रक्रिया करण्यासंदर्भात संशोधन होण्याची गरज आहे. त्यावर कृषी विद्यापीठांनी लक्ष केंद्रित करावं,’ अशी अपेक्षा रत्नागिरीचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केली.

शेवग्याच्या पानांचे लाडू, अळूच्या देठाचे बोंबिल फ्राय, रानभाजी पराठा-कढीपत्ता चटणी हे पदार्थ ठरले जिल्हास्तरीय रानभाज्या पाककला स्पर्धेत विजेते

जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवात घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. स्पर्धकांनी रानभाज्यांच्या अनेक कल्पक पाककृती सादर केल्या होत्या. पूजा सुरेश भुवड यांना रानभाजी पराठा-कढीपत्ता चटणी या पाककृतीसाठी पहिला क्रमांक मिळाला. अनन्या अक्षय खानविलकर यांनी केलेली अळूच्या देठाचे बोंबिल फ्राय (प्युअर व्हेज) ही पाककृती दुसऱ्या क्रमांकासाठी निवडली गेली. शर्मिली विनय गांगण यांनी केलेले शेवग्याच्या पानांचे लाडू तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.