अजूनही कोणी न लिहिलेल्या गोष्टी लीळाचरित्र, ज्ञानेश्वरीत – र. म. शेजवलकर

ठाणे : पुस्तक वाचताना त्यात नवे काय आहे ते मी शोधत असतो. कधी अकराव्या-बाराव्या शतकातील लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे ग्रंथ बारकाईने वाचले तर त्यात काही गोष्टी अशा सापडतात, ज्या आजही कोणी लिहिल्या नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक डॉ. र. म. शेजवलकर यांनी केले.