रत्नागिरीत आतापर्यंत सरासरीच्या ३८ टक्के पाऊस; ८८ टक्के क्षेत्रावर लावणी पूर्ण; कोट्यवधींचं नुकसान; मात्र निधी अप्राप्त

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पावसाळ्याची सुरुवात मे महिन्यातच झाली आणि मे महिन्यात ५२० मिलिमीटर पाऊस पडला. जूनमध्येही चांगला पाऊस झाला; मात्र एक जूनपासून १८ जुलैपर्यंतच्या (२०२५) कालावधीचा विचार करता वार्षिक सरासरीच्या केवळ ३८ टक्के पाऊस पडला आहे.