रत्नागिरी : ‘आजच्या काळात तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणेही लवकर बदलावी लागत आहेत. म्हणूनच ई-वेस्ट अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होण्याचे प्रमाण मोठे आहे. ई-कचऱ्याच्या निर्मितीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. त्या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास किंवा पुनर्वापर न केल्यास हवा, पाणी आणि जमिनीचे प्रदूषण होते. म्हणूनच ई-यंत्रण हा ई-कचरा संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला आहे,’ असे प्रतिपादन पुण्यातील पूर्णम इकोव्हिजन फाउंडेशन या संस्थेच्या दक्षता परब यांनी आज (२६ जानेवारी) रत्नागिरीत केले. ई-यंत्रण उपक्रमाचे रत्नागिरीतील उद्घाटन खेडशीतील श्रीनगर येथील अनुश्रुती एंटरप्रायझेस-पितांबरी शॉपीमध्ये झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. रत्नागिरीत हा उपक्रम राबविण्यासाठी अनबॉक्स युवर डिझायर या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
Like this:
Like Loading...