दिवाळीनिमित्त दिव्यांगांच्या कलाविष्कारात लॉकडाउनमध्येही खंड नाही; ‘आविष्कार’च्या वस्तू विकत घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : गेले काही महिने करोना आणि त्यामुळे सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व शाळा बंद आहेत. या काळात सामान्य विद्यार्थ्यांच्याच शिक्षणाची अडचण झाली आहे, तिथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणींची कल्पनाच केलेली बरी; मात्र रत्नागिरीतील आविष्कार संस्थेतील श्यामराव भिडे कार्यशाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी मात्र या कठीण काळातही आपली परंपरा राखली आहे.