Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

साठेबाजी, काळ्या बाजाराला प्रतिबंध; जीवनावश्यक वस्तूंच्या सहज उपलब्धतेकरिता व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Photo by Oleg Magni on Pexels.com

Advertisements

त्नागिरी : सध्या राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा आणि संचारबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध करून देताना व्यापाऱ्यांकडून साठेबाजी, तसेच काळा बाजार झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये, जीवनावश्यक वस्तू सुरळीतपणे उपलब्ध होणार आहेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा (१९८७) १३ मार्च २०२०पासून लागू केला आहे. तसेच, खंड २, ३, ४मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. करोनाच्या विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ लागू करण्यात आले असून, त्यानुसार संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

संचारबंदीच्या कालावधीत किराणा माल विक्रेते आणि केमिस्टकडून नागरिकांना जीवनावश्यक सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना खालील सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

या सूचनांचे पालन काटेकोरपणे करण्यात आले नाही, तर संबंधितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५चे कलम तीन व सातअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कळविले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version