रत्नागिरी : येथील जिद्दी माउंटेनीअरिंग संस्थेचे संस्थापक सदस्य अरविंद नवेले यांनी, जम्मू-काश्मीर भागातील १७ हजार ६९४ फूट (५ हजार ३९३ मीटर) उंचीचे मचोई शिखर सर केले.
Tag: संचारबंदी
कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवे कडक निर्बंध
मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. तसेच, रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.
विवाह आणि अन्य कार्यक्रमांना फक्त ५० व्यक्तीच उपस्थित राहू शकणार; राज्यात नवे कोविड निर्बंध लागू
राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून, अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 व्यक्तींना उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. हे निर्बंध 31 डिसेंबर 2021च्या रात्री 12:00 वाजल्यापासून अंमलात आले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट, अनेक सवलती
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असून सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याकरिता निर्बंधांमध्ये काही सवलती लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिले.
रत्नागिरी जिल्ह्यात आता दर शनिवार-रविवारी लॉकडाउन
ना प्रतिबंधासाठी ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या कडक लॉकडाउनमध्ये १० जूनपासून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. आता यापुढे दर शनिवार-रविवारी पूर्ण लॉकडाउन असेल, तर इतर दिवशी सायंकाळी पाच ते सकाळी पाच या वेळेत पूर्ण संचारबंदी लागू राहील.
रत्नागिरी जिल्ह्यात २ जूनपासून पुन्हा कडक निर्बंध, जिल्हासीमा बंद
रत्नागिरी : करोनाप्रतिबंधक ब्रेक द चेनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात दोन ते आठ जून या कालावधीत वैद्यकीय सेवा सोडून इतर सर्व आस्थापना पूर्ण वेळ बंद ठेवण्याससह जिल्हा प्रवेश बंदी करण्याचे निर्देश आज जारी करण्यात आले आहेत.