‘करवीर हायकर्स’नी फत्ते केली एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम

कोल्हापूरच्या ‘करवीर हायकर्स’ ग्रुपमधील सात जणांनी अत्यंत प्रतिकूल हवामानात खडतर अशी एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम फत्ते केली. समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर पोहोचून त्यांनी अभिमानाने तिरंगा झेंडा फडकवला, तसेच संविधानाची उद्देशिका प्रदर्शित केली. या मोहिमेत रत्नागिरीचे उप-जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्यासह त्यांच्या पत्नी डॉ. सुप्रिया यांचा सहभाग होता.

रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विसावे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : नाणीज (ता. रत्नागिरी) येथील श्रीमती मंजुळा तोडणकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदान केले. हे महाविद्यालयातील विसावे देहदान होते.

अधिक मासानिमित्त श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकार

पुरुषोत्तम मास अर्थात अधिक मासानिमित्त मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात कृष्ण यजुर्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले आहे.

लांजा-राजापूरमध्ये रविवारपासून साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण

लांजा : विश्व मराठी परिषद आयोजित साहित्य संस्कृती जागर पदभ्रमण परिक्रमेअंतर्गत पुण्याहून ६० तरुण १६ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत लांजा-राजापूर परिसराचा दौरा करणार आहेत.

ग्रिड सपोर्ट चार्ज राज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना नाही : महावितरणचे स्पष्टीकरण

छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवलेल्या सरसकट सर्व वीज ग्राहकांना ग्रिड सपोर्ट चार्ज द्यावा लागणार असल्याच्या विषयावरून गेले काही दिवस उलटसुलट चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर, महावितरणने गैरसमज दूर करण्यासाठी स्पष्टीकरण दिले आहे.

नाकावाटे ब्रेन ट्यूमर काढणारे न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञान ठरतेय वरदान; रत्नागिरीत १७ मे रोजी विशेष शिबीर

ठाण्यातील सोलारिस सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलने अत्याधुनिक न्यूरो नेव्हिगेशन तंत्रज्ञानाच्या साह्याने आतापर्यंत ब्रेन ट्यूमरच्या १००हून अधिक रुग्णांना जीवनदान दिले आहे. या तंत्रज्ञानामुळे मेंदू/कवटी न उघडता अचूकपणे शस्त्रक्रिया करता येत असल्याने रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. मणक्याच्या विकारांवरही याद्वारे उपचार करता येतात. सोलारिस हॉस्पिटलतर्फे रत्नागिरी नगर परिषदेच्या सहकार्याने मेंदू आणि मणक्याच्या आजारांविषयीचे (न्यूरॉलॉजी अँड स्पाइन) मोफत वैद्यकीय शिबीर रविवारी, १७ मे २०२६ रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे.