विद्यार्थ्यांनी मारुतीचा आदर्श ठेवावा : चारुदत्तबुवा आफळे

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी रामायणातील मारुतीचा आदर्श ठेवावा आणि आपले आयुष्य उज्ज्वल करावे, असे मार्गदर्शन राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी केले.

चिपळूणच्या विद्याभारती गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबिर पालघर येथे उत्साहात

चिपळूण : येथील विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल पंचकोश गुरुकुलचे मातृभूमी परिचय शिबिर पालघर येथे उत्साहात पार पडले.

पालकांनी काय करावे? काय करू नये? बियाणी बालमंदिरात प्रबोधन

रत्नागिरी : येथील भारत शिक्षण मंडळ संचालित पू. सौ.गोदवरीदेवी भ. बियाणी बालमंदिर आणि भिडे आजी खेळघरात पालकांसाठी खास प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते.

पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जगात कुठेही झाले नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात : डॉ. उदय सामंत

‘पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जगात कुठेही झालं नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात होत आहे. आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतंय, याचा पालकांना अभिमान असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून माझ्यासारख्या अनेकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे,’ असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.

रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिराचा प्रवेशोत्सव कार्यक्रम आज (१६ जून) उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात गुलाबपुष्प आणि चाफ्याचे फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचे स्वागत करण्यात आले. बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरातही शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला.

मुलांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबजल्या; रत्नागिरीत प्रवेशोत्सव उत्साहात

सुमारे दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज (१६ जून) नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे शाळा पुन्हा मुलांच्या किलबिलाटाने गजबजल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात १० हजार १२१ विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे.