हिंदू संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन : सरसंघचालक

पुणे : ‘दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत विषमता निर्मूलनाचा, समरसतेचाच विचार केला. समरसता ही त्यांची श्रद्धा होती. प्रचंड व्यासंग आणि आशयाच्या मुळाशी जाण्याची त्यांची दृष्टी होती. त्यातूनच त्यांनी विविध क्षेत्रात संघटना स्थापन केल्या आणि त्यांना देश-काल-परिस्थितीशी सुसंगत असे मार्गदर्शनदेखील केले. हे सर्व करत असताना त्यांनी हिंदू समाजाचे संघटन म्हणजेच विषमता निर्मूलन हे सूत्र कायम बाळगले,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १४ ऑक्टोबर रोजी पुण्यात केले.

एसटीच्या गणेशोत्सव विशेष गाड्यांचे तिकीट दरपत्रक

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या एसटीच्या गाड्यांचे तिकीट दरपत्रक एसटीच्या रत्नागिरी विभागातर्फे जाहीर करण्यात आले आहे.